
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 06
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.
प्रश्न 1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
1) अहिल्यानगर
2) चंद्रपूर
3) जळगाव
4) गोंदिया
उत्तर : 2) चंद्रपूर
स्पष्टीकरण : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. हे व्याघ्र प्रकल्प 1933 साली स्थापन करण्यात आले आहेत.याचे क्षेत्र 626 चौ.किमी आहे.
प्रश्न 2: 2025 च्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत ?
1) एम. नरसिंहम
2) डॉ. रघुराम राजन
3) संजय मल्होत्रा
4) शक्तिकांत दास
उत्तर : 3) संजय मल्होत्रा
प्रश्न 3: गाडीया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?
1) मध्यप्रदेश
2) बिहार
3) हरियाणा
4) राजस्थान
उत्तर : 4) राजस्थान
प्रश्न 4: …………….. ला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो ?
1) सौर ऊर्जा
2) अणु ऊर्जा
3) भरतीची ऊर्जा
4) भूऔष्णिक ऊर्जा
उत्तर : 4) भूऔष्णिक ऊर्जा
स्पष्टीकरण : भूऔष्णिक ऊर्जेला उपयोगात आणण्यासाठी लडाख मधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो.
ही ऊर्जा स्वच्छ, नूतनीकरणक्षम, शाश्वत, कार्बनमुक्त, पर्यावरणअनुकूल असते.
औष्णिक ऊर्जेमुळे कोळसा आणि तेलासारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित व कमी होऊ शकते.
प्रश्न 5: राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास, …………. पुनरावलोकन केले जाते.
1) घटनात्मक
2) न्यायिक
3) राजकीय
4) सामाजिक
उत्तर : 2) न्यायिक
स्पष्टीकरण : राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास न्यायिक पुनरावलोकन केले जाते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला कायदा केव्हा कार्यकारी आदेश हा घटनात्मक आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा असतो.
कायदा किंवा आदेश हा घटनेचे उल्लंघन करत असेल तर तो असंविधानिक, रद्दबाबत आणि बेकायदेशीर ठरवला जातो यालाच न्यायिक पुनरावलोकन असे म्हणतात.
प्रश्न 6: कारगिल मध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 साली केलेली कार्यवाही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ?
1) ऑपरेशन कारगिल
2) ऑपरेशन पोलो
3) ऑपरेशन विजय
4) ऑपरेशन लोटस
उत्तर : 3) ऑपरेशन विजय
प्रश्न 7: खालीलपैकी कोणती मध्ये हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे ?
1) महाभारत
2) पीरपंजाल
3) पूर्वांचल
4) शिवालिक
उत्तर : 2) पीरपंजाल
स्पष्टीकरण : पीरपंजाल ही मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे.
पीरपंजाल पर्वतरांग ही हिमालयातील पर्वतरांग आहे जी हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या भारतीय राज्यांमधून जाते.
गंगाशिखर हे पाकव्याप्त काश्मीरमधील बाग जिल्ह्यातील पीरपंजाल पर्वतरांगांतील 3044 मी. उंच पर्वत आणि पर्यटन स्थळ आहे.
प्रश्न 8: ……………. च्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते.
1) विंध्य पर्वतरांगा
2) सातपुडा पर्वतरांगा
3) पश्चिम घाट
4) पूर्व घाट
उत्तर : 3) पश्चिम घाट
स्पष्टीकरण : पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते.
सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातो. ही सुमारे 1600 कि.मी. लांबीची पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यातून जाऊन भारताच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारी पर्यंत जाऊन धडकते.
प्रश्न 9: खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा-ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो ?
1) सुंदरी
2) लहान दुधी
3) बाभूळ
4) देवदार (पाइन वृक्ष)
उत्तर : 1) सुंदरी
स्पष्टीकरण : सुंदरी हा वृक्ष गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
त्या भागात वृक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांना सुंदरबन म्हणूनही ओळखले जाते. वृक्ष 40 ते 45 फुटापर्यंत वाढतो.
प्रश्न 10: 1860 मध्ये दीनबंधू मित्र यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात निळीवाल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता ?
1) निलांबरी
2) नील दर्पण
3) निळीवरील अत्याचार
4) अनिल दर्पण
उत्तर : 2) नील दर्पण
प्रश्न 11: ब्रिटिश संसदेने ऑगस्ट …………… मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला.
1) 1938 साली
2) 1931 साली
3) 1935 साली
4) 1930 साली
उत्तर : 3) 1935 साली
स्पष्टीकरण : ब्रिटिश संसदेने ऑगस्ट 1935 मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. भारत सरकार कायदा 1935 ने प्रांतामधील दुहेरी शासन पद्धती संपुष्टात आणली आणि त्या जागी प्रांतीय स्वायत्तता आणली. प्रांतांना त्यांच्या पारिभाषित क्षेत्रात प्रशासनाची स्वायत्त एकके म्हणून काम करण्याची परवानगी होती.
प्रश्न 12: प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (PMGY) कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली आहे ?
1) 2000 साली
2) 1992 साली
3) 2010 साली
4) 2005 साली
उत्तर : 1) 2000 साली
स्पष्टीकरण : प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (PMGY) 2000 साली सुरू करण्यात आली होती.
ग्रामीण भागातील गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली होती.
तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ही योजना सुरू करण्यात आली होती.
प्रश्न 13: 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना ‘वंचित वर्ग संघटनेत (डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन)’ संघटित केले ?
1) ज्योतिबा फुले
2) विनोबा भावे
3) बाबा आमटे
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण : भारतीय निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये अनुसूचित जातींना न्याय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित वर्ग संघटना म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन ही संस्था संघटित केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये दलितांना डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन मध्ये संघटीत केले, त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारांची मागणी करून महात्मा गांधींशी संघर्ष केला.
प्रश्न 14: भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला चुखा हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मदत केली ?
1) बांगलादेश
2) श्रीलंका
3) चीन
4) भूतान
उत्तर : 4) भूतान
स्पष्टीकरण : भारत सरकारने भूतान या देशाला चूखा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मदत केली आहे.
प्रश्न 15: खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे ?
1) निलगिरी टेकड्या
2) सातपुडा टेकड्या
3) भामरागड टेकड्या
4) पेनुकोंडा टेकड्या
उत्तर : 2) सातपुडा टेकड्या
स्पष्टीकरण : सातपुडा टेकड्यामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे.
सातपुडा पर्वतरांगेने एकूण 75 हजार चौ.किमी क्षेत्र व्यापलेले असून, सातपुडा चा काही भाग वलीकरण व भूहालचालीतून निर्माण झालेला आहे.
सातपुडा पर्वतरांगेचे प्रामुख्याने तीन भाग आढळतात, त्यामध्ये पश्चिमेकडील राजपिपला टेकड्या, मध्य भारतातील बैतूल पठार, महादेव व गाविलगड टेकड्या आणि पूर्वेकडील मैकल पर्वतरांग यांचा समावेश आहे.
प्रश्न 16: ‘सिंहली’ ही खालीलपैकी कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे ?
1) श्रीलंका
2) चीन
3) भूतान
4) नेपाळ
उत्तर : 1) श्रीलंका
प्रश्न 17: खानदेश हा …………. च्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे.
1) कृष्णा नदी
2) गोदावरी नदी
3) नर्मदा नदी
4) तापी नदी
उत्तर : 4) तापी नदी
स्पष्टीकरण : खानदेश हा तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्हे मिळून खानदेश प्रदेश ओळखला जातो.तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई या ठिकाणी होतो. या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास तापी नदी मिळते.
प्रश्न 18: खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्यसैनिक, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ (Law Graduate) होत्या ?
1) अरुणा असफ अली
2) लक्ष्मी सहगल
3) गोदावरी परुळेकर
4) किरण देवी
उत्तर : 3) गोदावरी परुळेकर
स्पष्टीकरण : गोदावरी परुळेकर एक स्वातंत्र्यसैनिक, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या. ठाणे जिल्ह्यातील वारली या जमातीच्या महिलांच्या जीवनात सुधारणांची पहाट आणणारी कणखर स्त्री म्हणजे गोदावरी परुळेकर अंधश्रद्धेच्या जोकडातून त्यांची काही प्रमाणात सुटका करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
प्रश्न 19: खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लखणीय उदाहरण आहे आणि ते सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी बनवले गेले होते ?
1) लोखंडी स्तंभ
2) लाल किल्ला
3) सफदरजंग मकबरा
4) दिवान ए आम
उत्तर : 1) लोखंडी स्तंभ
स्पष्टीकरण : लोखंडी स्तंभ हे दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 वर्षांपूर्वी बनवले गेले होते.
हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या गंज प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे.
या स्तंभाचे वजन 3000 किलोपेक्षा जास्त आहे असे मानले जाते. हा स्तंभ गुप्तांच्या राजवटीत बांधला गेला.
प्रश्न 20: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा पारित केला ?
1) 1857 साली
2) 1885 साली
3) 1892 साली
4) 1879 साली
उत्तर : 4) 1879 साली
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 06