
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 05 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 05
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.
प्रश्न 1: सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणते नेत्याचे नाव देण्यात आले आहे ?
1) गोपीनाथ मुंडे
2) बाळासाहेब ठाकरे
3) राज ठाकरे
4) शरद पवार
उत्तर : 4) शरद पवार
प्रश्न 2: “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’ हा नारा कोणी दिला होता ?
1) सरदार वल्लभभाई पटेल
2) महात्मा गांधी
3) जवाहरलाल नेहरू
4) बाळ गंगाधर टिळक
उत्तर : 4) बाळ गंगाधर टिळक
स्पष्टीकरण: ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच’ हा नारा बाळ गंगाधर टिळक यांनी दिला.
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते होते. टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते.
तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते.
प्रश्न 3: 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त ………… वर्षे होते.
1) 23 वर्षे
2) 21 वर्षे
3) 24 वर्षे
4) 22 वर्षे
उत्तर : 1) 23 वर्षे
स्पष्टीकरण: 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती.
त्यावेळी भगतसिंग यांचे वय 23 वर्ष होते. या तीनही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात दरवर्षी 23 मार्च हा दिन शहीद दिवस म्हणून पाळला जातो.
प्रश्न 4: भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे ?
1) वेदांथंगल पक्षी अभयारण्य
2) चिंतामणी कर पक्षी अभयारण्य
3) नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्य
4) कुंथनकुलम पक्षी अभयारण्य
उत्तर : 1) वेदांथंगल पक्षी अभयारण्य
स्पष्टीकरण: भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य वेदांथंगलला स्थानिक ग्रामस्थांच्या याचिकेमुळे हा दर्जा देण्यात आला होता जो 1796 मध्ये ब्रिटिश सैनिकांना पक्ष्यांवर गोळीबार करताना पाहून ते हैराण झाले होते.
प्रश्न 5: बौद्ध वास्तूशिल्पात, ‘हार्मिका’ हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे ?
1) मठ
2) पॅगोडा
3) स्तूप
4) विहार
उत्तर : 3) स्तूप
स्पष्टीकरण: बौद्ध वास्तूशिल्पात, हार्मिका हा शब्द स्तूपाशी संबंधित आहे. स्तूप ही मुख्यत्वे करून बौद्ध धर्मीयांची वास्तूरचना आहे.
वास्तुकला, मूर्तीकला व चित्रकला या तीनही कला प्रकारात बौद्ध कलेचा अविष्कार झाला.
प्रश्न 6: 1904 मध्ये पुण्यात ‘श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज’ याची स्थापना …………….. यांनी केली.
1) शिवराम जानबा कांबळे
2) गोपाळबाबा वलंगकर
3) दादासाहेब गायकवाड
4) विनायक दामोदर सावरकर
उत्तर : 1) शिवराम जानबा कांबळे
प्रश्न 7: जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे ॲमेझॉनचे जंगल खालीलपैकी कोणत्या खंडात आहे ?
1) आफ्रिका
2) उत्तर अमेरिका
3) दक्षिण अमेरिका
4) अंटार्टिका
उत्तर : 3) दक्षिण अमेरिका
प्रश्न 8: खालीलपैकी भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेली आंतरराष्ट्रीय रेल्वे कोणती आहे ?
1) बंधन एक्सप्रेस
2) मिताली एक्सप्रेस
3) समझौता एक्सप्रेस
4) मैत्री एक्सप्रेस
उत्तर : 3) समझौता एक्सप्रेस
प्रश्न 9: खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे, जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत ?
1) नेपाळ
2) भारत
3) पाकिस्तान
4) म्यानमार
उत्तर : 2) भारत
स्पष्टीकरण: भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत. गुजरात मधील गीर जंगल हे भारतीय सिंहाचे नैसर्गिक अधिवास आहे.
वाघ मध्य प्रदेशातील जंगले, पश्चिम बंगालचे सुंदरबन आणि हिमालयीन प्रदेशात आढळतात.
प्रश्न 10: भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली ?
1) राज्यघटनेतील 42 वी घटनादुरुस्ती
2) राज्यघटनेतील 44 वी घटनादुरुस्ती
3) राज्यघटनेतील 41 वी घटनादुरुस्ती
4) राज्यघटनेतील 43 वी घटनादुरुस्ती
उत्तर : 1) राज्यघटनेतील 42 वी घटनादुरुस्ती
प्रश्न 11: बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते ?
1) भारतीय रिझर्व बॅंक (RBI)
2) भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI)
3) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD)
4) भारतीय स्टेट बँक (SBI)
उत्तर : 1) भारतीय रिझर्व बॅंक (RBI)
स्पष्टीकरण: बँकिंग प्रणालीतील भारतीय रिझर्व बँक ही संस्था अर्थव्यवस्थेतील चलनपुरावाट्याचे नियमन आणि नियंत्रण करते.
आरबीआय ही देशातील बँकिंग नियमक संस्था आहे, जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते ज्याचे बँकांना पालन करावे लागते.
प्रश्न 12: 44 व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकला आहे ?
1) समानतेचा अधिकार
2) शैक्षणिक अधिकार
3) संपत्तीचा अधिकार
4) स्वातंत्र्याचा अधिकार
उत्तर : 3) संपत्तीचा अधिकार
प्रश्न 13: गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात स्थित आहेत ?
1) केरळ
2) राजस्थान
3) गुजरात
4) जम्मू काश्मीर
उत्तर : 4) जम्मू काश्मीर
प्रश्न 14: 2022-23 या आर्थिक वर्षात GDP वाढीची (विस्तार) टक्केवारी किती होती ?
1) 2 टक्के
2) 4 टक्के
3) 5 टक्के
4) 7 टक्के
उत्तर : 4) 7 टक्के
स्पष्टीकरण: सन 2022-23 या आर्थिक वर्षात GDP वाढीची टक्केवारी 7 टक्के होती. सन 2030 पर्यंत भारताचा GDP जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज आहे.
प्रश्न 15: महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे ?
1) बोरियल प्रकारची जंगले
2) समशितोष्ण सूचीपर्णी प्रकारची जंगले
3) समशितोष्ण वर्षावने
4) शुष्क पानझडी प्रकारची जंगले
उत्तर : 4) शुष्क पानझडी प्रकारची जंगले
स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात शुष्क पानझडी प्रकारची जंगल आहेत.शुष्क पानझडी वने वार्षिक 50 ते 100 cm पावसाच्या प्रदेशात आढळतात.
राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण 60 ते 62 टक्के आहे.
प्रश्न 16: ब्राम्हो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली ?
1) 1826 साली
2) 1824 साली
3) 1828 साली
4) 1830 साली
उत्तर : 3) 1828 साली
स्पष्टीकरण: 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राम्हो सभेची स्थापना राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती.
प्रश्न 17: महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे ?
1) उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे
2) अर्धशुष्क प्रकारचे
3) समशितोष्ण प्रकारचे
4) अतिउष्ण प्रकारचे
उत्तर : 1) उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे
स्पष्टीकरण: महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सूनचे आहे कारण येथे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि उन्हाळा गरम असतो आणि हिवाळा थंड असतो. महाराष्ट्र पठारावर हवामान कोरडे तर कोकणचे हवामान उष्ण व दमट असते.
प्रश्न 18: खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे ?
1) जायकवाडी
2) तिहरी
3) भाक्रा नांगल
4) निजामसागर
उत्तर : 3) भाक्रा नांगल
प्रश्न 19: 2011 च्या जनगणनेच्या माहितीनुसार, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या सर्वाधिक आहे ?
1) झारखंड
2) मिझोरम
3) मध्य प्रदेश
4) छत्तीसगड
उत्तर : 3) मध्य प्रदेश
स्पष्टीकरण: 2011 च्या जनगणनेच्या माहितीनुसार, भारतातील मध्य प्रदेश राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या सर्वात जास्त आहे.
भारतातील मध्य प्रदेशामध्ये 46 मान्यता प्राप्त अनुसूचित जमाती आहेत. मध्यप्रदेशात सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या 14.7 टक्के आहे.
प्रश्न 20: IBEF अहवाल 2020 च्या माहितीनुसार, महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठा ………….. उत्पादक आहे.
1) ज्यूट
2) गहू
3) तांदूळ
4) ऊस
उत्तर : 4) ऊस
स्पष्टीकरण: IBEF अहवाल 2020 च्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा ऊस उत्पादक राज्य आहे.
ऊस उष्णकटिबंधीय पीक आहे जे इतर अनेक देशांसह भारतात घेतले जाते. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगर हे राज्यातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेश आहेत.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 05 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 05