Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 02

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 02

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02

 

प्रश्न 1: भारतातील ‘शीत वाळवंट’ हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) हिमाचल प्रदेश
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर : 3) हिमाचल प्रदेश

प्रश्न 2: खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे ?
1) बिहार
2) राजस्थान
3) महाराष्ट्र
4) आसाम
उत्तर : 3) महाराष्ट्र
स्पष्टीकरण: कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या नगदी पिकांपैकी एक आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.
भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य गुजरात आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्य आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. हे एकूण कापूस क्षेत्राच्या सुमारे 34% व्याप्ते आणि उत्पादनात 17% योगदान देते.

प्रश्न 3: ………….. रोजी भारतीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.
1) ऑक्टोबर 1929
2) डिसेंबर 1925
3) डिसेंबर 1929
4) जानेवारी 1925
उत्तर : 3) डिसेंबर 1929
स्पष्टीकरण: 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात ऐतिहासिक पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला.
1929 मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी एक अस्पष्ट घोषणा केली, ज्याला आयर्विन घोषणा म्हणून ओळखले जाते.

प्रश्न 4: महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते ?
1) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
2) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
3) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
4) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
उत्तर : 1) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
स्पष्टीकरण: महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते.
नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव पडले आहे.
हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनाच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात.

प्रश्न 5: महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला ?
1) बाळ गंगाधर टिळक
2) ज्योतिराव फुले
3) विनायक दामोदर सावरकर
4) आनंदी गोपाळ जोशी
उत्तर : 1) बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 6: भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते ?
1) भिलाई आणि पश्चिम महाराष्ट्र
2) कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र
3) बोकारो आणि दक्षिण महाराष्ट्र
4) खांडवा आणि उत्तर महाराष्ट्र
उत्तर : 2) कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र
स्पष्टीकरण: कोळसा हे प्रकारचे जीवाश्म इंधन आहे.
झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे. कोरबा, चिरीमिरी, आणि महाराष्ट्र ही सर्वोच्च कोळसा उत्पादक प्रदेश आहेत.
भारतात कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते.

प्रश्न 7: ‘कथ्थक’ हे लोकप्रिय लोक नृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे ?
1) हरियाणा
2) पंजाब
3) उत्तर प्रदेश
4) राजस्थान
उत्तर : 3) उत्तर प्रदेश

प्रश्न 8: भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार ………… द्वारे होतो.
1) रेल्वे वाहतूक
2) रस्ते वाहतूक
3) हवाई मार्ग
4) सागरी मार्ग
उत्तर : 4) सागरी मार्ग
स्पष्टीकरण: भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो.
भारताला बेटांसह अंदाजे 7,517 किमी लांबीचा समुद्र किनारा आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या परिवहन क्षेत्रात सागरी मार्ग महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतातील व्यापाराच्या आकाराच्या सुमारे 95% आणि मूल्याच्या सुमारे 70 टक्के व्यापार हा सागरी मार्गाने केला जातो.

प्रश्न 9: दुर्ग – बस्तर – चंद्रपूर हा लोहपट्टा (आयर्न बेल्ट) भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
1) मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र
2) छत्तीसगड आणि ओडिशा
3) मध्यप्रदेश आणि ओडिशा
4) छत्तीसगड आणि महाराष्ट्र
उत्तर : 4) छत्तीसगड आणि महाराष्ट्र
स्पष्टीकरण: दुर्ग – बस्तर – चंद्रपूर हा लोहपट्टा (आयर्न बेल्ट) हा भारतातील छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यात आहे.
छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलाडीला पर्वत श्रेणीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे हेमाटाईट्स आढळतात.
टेकड्यांच्या श्रेणीमध्ये सुपर हाय ग्रेड हेमाटाईट लोहखनिजाचे 14 साठे आहेत.

प्रश्न 10: ‘ताजमहाल’ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ?
1) आग्रा
2) दिल्ली
3) मुंबई
4) जयपुर
उत्तर : 1) आग्रा
स्पष्टीकरण: ताजमहालासाठी राजस्थानमधील मकराना येथील संगमरवरचा वापर करण्यात आला आहे.
ताजमहालाचा 1983 साली युनोस्कोच्या वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न 11: स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते ?
1) 21 वर्षापेक्षा जास्त
2) 30 वर्षापेक्षा जास्त
3) 25 वर्षापेक्षा जास्त
4) 18 वर्षापेक्षा जास्त
उत्तर : 1) 21 वर्षापेक्षा जास्त
स्पष्टीकरण: स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले वय 21 वर्षापेक्षा जास्त होते.
मतदानाची वय हे कायद्याने स्थापित केलेले किमान वय आहे जे एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक निवडणुकात मतदान करण्यास पात्र होण्यापूर्वी गाठले पाहिजे.
61 व्या घटनादुरुस्तीने (1988-89) मतदानासाठीचे पात्रता वय हे 18 वर्ष करण्यात आले.

प्रश्न 12: शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो ?
1) भीमाशंकर, पुणे
2) यावल, जळगाव
3) सागरेश्वर, सांगली
4) कर्नाळा, रायगड
उत्तर : 1) भीमाशंकर, पुणे
स्पष्टीकरण: शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे.
शेकरू हा प्राणी खार या वर्गातील आहे.
शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने आपल्याला भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो.

प्रश्न 13: 2011 च्या जनगणनेनुसार, मागील दशकात …………. व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले.
1) सुमारे 11 कोटी
2) सुमारे 13 कोटी
3) सुमारे 21 कोटी
4) सुमारे 17 कोटी
उत्तर : 3) सुमारे 21 कोटी
स्पष्टीकरण: सन 2011 ची भारतीय जनगणना म्हणजे 15 वी भारतीय जनगणना होते.
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी इतकी आहे.
उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार मागील दशकात सुमारे 21 कोटी व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले.

marathi naukri telegram

प्रश्न 14: भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे ?
1) फर वृक्ष
2) साल वृक्ष
3) देवदार वृक्ष
4) पाईन वृक्ष
उत्तर : 2) साल वृक्ष
स्पष्टीकरण: भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे. हे वृक्ष मूळतः भारतीय उपखंडातील आहे, हे हिमालयाच्या दक्षिणेस पूर्वेस म्यानमारपासून नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत आढळते. छत्तीसगड आणि झारखंड या दोन भारतीय राज्यांचा साल हा राज्य वृक्ष आहे.

प्रश्न 15: खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे ?
1) सेव्ह व्हल्चर्स
2) बोर्ड फॉर इंडियन वर्ल्ड लाईफ
3) इंडियन वर्ल्ड लाईफ असोसिएशन
4) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS)
उत्तर : 4) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS)

प्रश्न 16: परतीच्या मान्सून (Retreating Monsoon) ऋतूत ……….. येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते.
1) तामिळनाडू
2) गुजरात
3) आंध्र प्रदेश
4) राजस्थान
उत्तर : 1) तामिळनाडू
स्पष्टीकरण: परतीच्या मान्सून ऋतूत तामिळनाडू येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. तामिळनाडू हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे.
दक्षिण भारतात सामान्यतः नैऋत्य मान्सून पासून पाऊस पडतो पण अरबी समुद्रातून निर्माण होणाऱ्या या नैऋत्य मान्सूनला पश्चिम घाटात अडथळा येतो म्हणून तमिळनाडूमध्ये बहुतेक पाऊस ईशान्य कडून पडतो आणि हिवाळ्याच्या हंगामात मान्सून मागे पडतो.

प्रश्न 17: महाराष्ट्रातील ‘चैत्यभूमी’ कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्त्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) कृष्णकांत देविदास
3) महात्मा गांधी
4) स्वातंत्र्यवीर सावरकर
उत्तर : 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न 18: भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे ?
1) अनुच्छेद 51 A
2) अनुच्छेद 21 A
3) अनुच्छेद 19
4) अनुच्छेद 14
उत्तर : 1) अनुच्छेद 51 A
स्पष्टीकरण: स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेत 42 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली.
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख अनुच्छेद 51 A मध्ये करण्यात आला आहे.

प्रश्न 19: ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले ?
1) रौलेट अधिनियम 1919
2) भारतीय परिषद अधिनियम 1919
3) भारतीय परिषद अधिनियम 1909
4) भारत सरकार अधिनियम 1935
उत्तर : 1) रौलेट अधिनियम 1919
स्पष्टीकरण: ब्रिटिश सरकारने रौलेट अधिनियम 1919 हा अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवण्यात आला.

प्रश्न 20: उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा ………….. अलंकार होतो.
1) उत्प्रेक्षा अलंकार
2) स्वभावोक्ती अलंकार
3) व्यतिरेक अलंकार
4) अनन्वय अलंकार
उत्तर : 4) अनन्वय अलंकार
स्पष्टीकरण: उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो.

 


Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 02

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *