
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 03
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.

प्रश्न 1: खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती ?
1) बाबा आमटे
2) विनोबा भावे
3) धोंडो केशव कर्वे
4) वीरेश लिंगम
उत्तर : 2) विनोबा भावे
स्पष्टीकरण: भूदान चळवळ एप्रिल 1951 मध्ये महात्मा गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती.
याची सुरुवात तेलंगणाच्या पोचमपाली या ठिकाणाहून झाली.
भूदान चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून देखील ओळखले जाते.
प्रश्न 2: भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात ?
1) भारतीय रिझर्व बॅंकेचे अध्यक्ष
2) भारताचे महान्यायवादी
3) भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
4) भारताचे अर्थमंत्री
उत्तर : 3) भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
स्पष्टीकरण: भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात.
घटनेतील संबंधित कलम – 148
प्रश्न 3: खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?
1) नायट्रोजन
2) सल्फर डाय-ऑक्साइड
3) कार्बनडाय-ऑक्साइड
4) वरील सर्व
उत्तर : 1) नायट्रोजन
प्रश्न 4: खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायूक्षेत्र आहे ?
1) वर्धा
2) मुंबई हाय
3) नागपूर
4) वरोरा
उत्तर : 2) मुंबई हाय
स्पष्टीकरण: मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किलोमीटर पश्चिमेस असलेले सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायूक्षेत्र आहे.
मुंबई हाय तेलक्षेत्राचा शोध 1964 ते 1967 या काळात भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खांबातच्या आखातात केलेल्या मोहिमेत लागला.
प्रश्न 5: भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 2011 साली
2) 1911 साली
3) 1972 साली
4) 1872 साली
उत्तर : 4) 1872 साली
स्पष्टीकरण: भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिली जनगणना सुरू करण्यात आली.
सन 1931 पर्यंत ज्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील माहितीची नोंद करण्यात आली.
भारतामध्ये 1872 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड मियो याच्या कारकीर्दीत ही जनगणना करण्यात आली.
प्रश्न 6: बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे ………….. बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे.
1) चोल काळात
2) मुघल काळात
3) चेर काळात
4) ब्रिटिश काळात
उत्तर : 1) चोल काळात
स्पष्टीकरण: बृहदेश्वर किंवा राज राजेश्वर मंदिर हे चोल काळात बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे.
बृहदेश्वर मंदिर हे तंजावर, तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित भगवान शिवाला समर्पित द्राविड शैलीतील हिंदू मंदिर आहे.
प्रश्न 7: 1840 च्या दशकात मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेची लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली ?
1) गोविंद मंडळी
2) महादेव मंडळी
3) दादोबा मंडळी
4) परमहंस मंडळी
उत्तर : 4) परमहंस मंडळी
स्पष्टीकरण: सन 1840 च्या दशकात मुंबई मूर्ती पूजा आणि जाती व्यवस्थेची लढा देण्याच्या उद्देशाने परमहंस मंडळी या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली.
परमहंस मंडळी हा एक गुप्त सामाजिक धार्मिक गट होता जो 1849 मध्ये मुंबईत स्थापन झाला होता.
याची सुरुवात दुर्गाराम मेहताजी, दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि त्यांच्या मित्रांच्या गटाने केली होती.
प्रश्न 8: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 6 जुलै 1981
2) 7 सप्टेंबर 1970
3) 9 ऑक्टोबर 1987
4) 25 सप्टेंबर 1970
उत्तर : 2) 7 सप्टेंबर 1970
स्पष्टीकरण: महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम 1969 च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्यात प्रदूषण नियंत्रणाचे काम करते.
प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात ?
1) भारतीय (Royal Bengal) वाघ
2) मलायन (Malayan) वाघ
3) सुमात्रण (Sumatran) वाघ
4) पांढरे वाघ
उत्तर : 1) भारतीय (Royal Bengal) वाघ
स्पष्टीकरण: भारतीय (Royal Bengal) वाघ ही सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात.
वाघ मांजर कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे.
वाघाची लांबी सर्वसाधारण सहा ते सात फूट असते व वजन सुमारे 100 ते 200 किलो असते.
भारतीय वाघ ही सर्वात जास्त संख्या असलेली एक उपप्रजाती आहे.
प्रश्न 10: महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा …………. नदी खोऱ्यात वसलेला आहे.
1) कोसी नदी
2) नर्मदा नदी
3) ब्रह्मपुत्रा नदी
4) तापी नदी
उत्तर : 4) तापी नदी
स्पष्टीकरण: नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
खानदेश भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील उत्तरेकडील भागाचा ही समावेश होतो.
हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे.
तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील मुलताई या डोंगरात आहे.
प्रश्न 11: सीमा रस्ते संघटनेने (Border Roads Organization) बांधलेला 9.2 किमी लांबीचा अटल बोगदा …………. ला जोडतो.
1) नुब्रा ते लाहौल – स्पिती दरी
2) मनाली ते लाहौल – स्पिती दरी
3) लेह ते लडाख
4) लेह ते नुब्रा दरी
उत्तर : 2) मनाली ते लाहौल – स्पिती दरी
स्पष्टीकरण: अटल बोगदा हा माझी भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेले लेह वरील हिमालयातील पूर्वपीर पंजाल पर्वत रांगेत रोहतांग खिंडीत बनलेला एक बोगदा आहे. हा भारतातील सर्वात लांब असलेल्या बोगद्यांपैकी एक आहे.
हा बोगदा मनाली ते लाहौल – स्पिती खोऱ्याला जोडतो.
प्रश्न 12: लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात ?
1) रोटेशन (Rotation)
2) पूल फॅक्टर (Pull Factor)
3) पुश फॅक्टर (Push Factor)
4) चॅलेंजिंग फॅक्टर (Challenging Factor)
उत्तर : 3) पुश फॅक्टर (Push Factor)
स्पष्टीकरण: लोक त्यांच्यामुळे ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात, तेव्हा त्याला पुश फॅक्टर म्हणतात.
उदाहरणांमध्ये खराब राहणीमान, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढलेली बेरोजगारी आणि कमी वेतन यांचा समावेश यामध्ये होतो.
प्रश्न 13: वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात ?
1) जुलै आणि ऑगस्ट
2) जून आणि जुलै
3) फेब्रुवारी आणि मार्च
4) एप्रिल आणि मे
उत्तर : 4) एप्रिल आणि मे
स्पष्टीकरण: उन्हाळा ऋतू जरी पावसाचा नसला तरी एप्रिल व मे महिन्यात अधून मधून वळवाचा पाऊस पडतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन वादळे वारे वाहतात.
साधारणपणे वैशाख महिना हा त्यांचा काळ असल्यामुळे त्यांना बंगाली भाषेत कालबैसाखी या नावाने ओळखले जाते.
प्रश्न 14: भारतातील कोणता पहिला जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर उर्जेवर चालते ?
1) माजुली – आसाम
2) अनंतपुर – आंध्र प्रदेश
3) सुरत – गुजरात
4) अररिया – बिहार
उत्तर : 3) सुरत – गुजरात
प्रश्न 15: 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला ?
1) गोरखपुरचा तह
2) सुगौलीचा तह
3) कुमाऊँचा तह
4) गढवालचा तह
उत्तर : 2) सुगौलीचा तह
स्पष्टीकरण: सन 1816 मध्ये सुगौलीच्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला.
सन 1816 मध्ये सुगौली करारावर स्वाक्षरी करून युद्ध संपले.
या करारानुसार काही काळ नेपाळ नियंत्रित प्रदेश EIC ला दिला.
इंग्रज नेपाळ युद्ध हे 1814 ते 1816 च्या दरम्यान नेपाळचे अधिराज्य व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली युद्ध होते.
प्रश्न 16: क्रांतिवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती ?
1) आत्मनिष्ठ युवती
2) प्रार्थना समाज
3) लोकहितवादी
4) सत्यशोधक समाज
उत्तर : 1) आत्मनिष्ठ युवती
प्रश्न 17: खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले ?
1) 1816-23
2) 1824-26
3) 1801-06
4) 1761-64
उत्तर : 2) 1824-26
स्पष्टीकरण: सन 1824-1826 दरम्यान पहिले अँग्लो- बर्मा युद्ध झाले आणि बर्मामध्ये ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली.
युद्धामुळे बर्माचे राज्य दिवाळीखोर झाले आणि ते कायमचे कमकुवत झाले.
हे युद्ध ब्रिटिश भारतीय इतिहासातील सर्वात महागड्या युद्धांपैकी एक आहे.
प्रश्न 18: महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे ?
1) अकोला
2) नाशिक
3) अमरावती
4) अहमदनगर
उत्तर : 2) नाशिक
प्रश्न 19: सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत ?
1) अनुच्छेद 22-23
2) अनुच्छेद 23-24
3) अनुच्छेद 29-30
4) अनुच्छेद 19-22
उत्तर : 3) अनुच्छेद 29-30
स्पष्टीकरण: सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29-30 शी संबंधित आहेत.
भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 29 अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाची हमी देते, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 30 अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देतो.
प्रश्न 20: वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून असले मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा, अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते ?
1) शेल्टर बेल्ट (Shelterbelt)
2) मिश्र वनीकरण (Mixed Forestry)
3) रेखीय पट्टी वृक्षारोपण (Liner Strip Plantation)
4) आश्रय वृक्षारोपण (Shelter Plantation)
उत्तर : 1) शेल्टर बेल्ट (Shelterbelt)
स्पष्टीकरण: वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी शेल्टर बेल्टची व्याख्या केली जाते.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 03