
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 04
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.

प्रश्न 1: महाराष्ट्रातील ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
1) नाशिक
2) सोलापूर
3) सिंधुदुर्ग
4) रायगड
उत्तर : 2) सोलापूर
प्रश्न 2: खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते ?
1) सह्याद्री पर्वतरांग
2) विंध्य पर्वतरांग
3) सातपुडा पर्वतरांग
4) अन्नामलाई पर्वतरांग
उत्तर : 1) सह्याद्री पर्वतरांग
स्पष्टीकरण: सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते.
सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्या शेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे.
या डोंगररांगेचे क्षेत्रफळ 60,000 चौ.किमी असून या रांगेची सरासरी उंची 1200 मी. आहे.
प्रश्न 3: सोलापूर व अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे ………….. क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.
1) समशीतोष्ण
2) मध्यम
3) शुष्क
4) अर्द्र
उत्तर : 3) शुष्क
स्पष्टीकरण: सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.
अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
त्याच्या उत्तरेस नाशिक व छ. छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणे सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत.
प्रश्न 4: ‘जैन आगम’ हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत ?
1) पाली
2) तामिळ
3) प्राकृत
4) संस्कृत
उत्तर : 3) प्राकृत
प्रश्न 5: भूतान मध्ये कोणत्या प्रकारचे शासन अमलात आणले जाते ?
1) लोकशाही प्रजासत्ताक सरकार
2) घटनात्मक राजेशाही
3) संसदीय लोकशाही
4) अराजकता
उत्तर : 2) घटनात्मक राजेशाही
स्पष्टीकरण: भूतान मधील सरकारचे स्वरूप हे लोकशाही संवैधानिक राजेशाही आहे.
प्रश्न 6: 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, गुजरात मधील बार्डोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले, हे आंदोलन ………… याच्या विरोधात होते.
1) मिठावरील करातील वाढ
2) आयात करातील वाढ
3) निर्यात महसुलातील वाढ
4) जमीन महसुलातील वाढ
उत्तर : 4) जमीन महसुलातील वाढ
स्पष्टीकरण: सन 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात मधील, बार्डोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन जमीन महसुलातील वाढ याच्या विरोधात होते.
बार्डोली सत्याग्रह ही एक कृषी चळवळ होती ज्याचे नेतृत्व सरदार वल्लभ भाई पटेल यांनी केले होते.
या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आली होती.
प्रश्न 7: संसदेत राष्ट्रपतींद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात ?
1) दोन सदस्य
2) चार सदस्य
3) आठ सदस्य
4) बारा सदस्य
उत्तर : 1) दोन सदस्य
प्रश्न 8: …………… म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री होय.
1) स्वातंत्र्य
2) न्याय
3) बंधूभाव
4) समानता
उत्तर : 3) बंधूभाव
स्पष्टीकरण: बंधूभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय.
बंधूभाव म्हणजे बंदुत्वाची भावना तसेच मूलभूत कर्तव्य (अनुच्छेद 51 A) म्हणजे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांच्या एकोपा आणि समान बंधुभावाची भावना वाढवणे हे भारतातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
प्रश्न 9: महाराष्ट्रातील रत्नागिरी मध्ये …………. चे समृद्ध साठे आहेत.
1) सोने
2) लोखंड
3) अभ्रक
4) बॉक्साइट
उत्तर : 4) बॉक्साइट
स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील रत्नागिरी मध्ये बॉक्साइटचे समृद्ध साठे आहेत. बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे 21% बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत आणि ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सांगली व सातारा या जिल्ह्यात आढळतात.
प्रश्न 10: विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा.
1) कोल्हापूर
2) नाशिक
3) नागपूर
4) पुणे
उत्तर : 3) नागपूर
स्पष्टीकरण: विदर्भातील मुख्य शहराचे नाव नागपूर आहे.नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर या शहरात भरवले जाते.
प्रश्न 11: खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात ?
1) सत्याग्रह
2) चिपको आंदोलन
3) चेन नियम
4) हरित क्रांती
उत्तर : 2) चिपको आंदोलन
प्रश्न 12: हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे ?
1) आसाम हिमालय
2) नेपाळी हिमालय
3) कुमाऊ हिमालय
4) हिमाचल हिमालय
उत्तर : 3) कुमाऊ हिमालय
स्पष्टीकरण: हिमालयाची पूर्व पश्चिम असे तीन विभाग केले जातात.
पश्चिम हिमालय
मध्ये हिमालय
पूर्व हिमालय
पश्चिम हिमालय – या हिमालयाचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय, कुमाऊ हिमालय.
कुमाऊ हिमालय सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत पसरला आहे. उत्तराखंडमधील पर्वतरांगेला कुमाऊ हिमालय असे म्हणतात.
गंगा नदी व यमुना नद्यांची उगमस्थाने कुमाऊ हिमालयात आहेत.
प्रश्न 13: महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ?
1) नागपूर
2) नाशिक
3) अहमदनगर
4) कोल्हापूर
उत्तर : 4) कोल्हापूर
प्रश्न 14: अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहेत ?
1) मुंबई
2) कोल्हापूर
3) नाशिक
4) छ. संभाजीनगर
उत्तर : 4) छ. संभाजीनगर
स्पष्टीकरण: अजिंठा लेणी प्राचीन बौद्ध रॉक कट आर्किटेक्चर मधील एक महान कामगिरीचे उदाहरण आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा वेरूळ लेणी ही सातवाहन वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली.
ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.
ही लेणी छ. संभाजीनगर शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहेत.
प्रश्न 15: पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते कोण आहेत ?
1) माधव गोडबोले
2) नरेंद्र जाधव
3) जयंत नारळीकर
4) मोहन धारिया
उत्तर : 4) मोहन धारिया
प्रश्न 16: भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये ………….. पर्यंत पोहोचली आहे.
1) 3,000 दशलक्ष
2) 1,210 दशलक्ष
3) 4,100 दशलक्ष
4) 2,100 दशलक्ष
उत्तर : 2) 1,210 दशलक्ष
स्पष्टीकरण: भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, ती 1951 मधील 361 दशलक्षावरून 2011 मध्ये 1,210 दशलक्षा पर्यंत पोहोचली आहे.
सध्याची भारताची लोकसंख्या ही सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.
जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17% आहे.
प्रश्न 17: भारतीय राज्यघटनेच्या ………….. मध्ये विहित केलेल्या प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे.
1) अनुच्छेद 80
2) अनुच्छेद 50
3) अनुच्छेद 23
4) अनुच्छेद 61
उत्तर : 4) अनुच्छेद 61
स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 नुसार विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे.
घटनेच्या अनुच्छेद 61 नुसार राष्ट्रपतींनी घटनेचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध महाभियोगाचा ठराव आणता येतो.
जेव्हा एखाद्या राष्ट्रपती वर घटनेच्या उल्लंघनासाठी महाभियोग चालवला जातो तेव्हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आरोपाला प्राधान्य दिले जाते.
प्रश्न 18: जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) गोपाळ बाबा वलंगकर
3) अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर
4) राजर्षी शाहू महाराज
उत्तर : 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण: अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे या सभेचे ध्येय होते.
प्रश्न 19: 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतामध्ये रस्त्यांचे जगातील …………. जाळे आहे, जे एकूणपणे सुमारे 62.16 लाख किमी आहे.
1) तिसऱ्या क्रमांकाचे मोठे
2) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे
3) चौथ्या क्रमांकाचे मोठे
4) सहाव्या क्रमांकाचे मोठे
उत्तर : 2) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे
स्पष्टीकरण: सन 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्यांचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे, जे एकूण पणे सुमारे 62.16 लाख किमी आहे.
भारतात 71% मालवाहतूक व 85% प्रवासी वाहतूक रस्त्यांमार्फत होते. युनायटेड स्टेट्स मध्ये जगातील सर्वात मोठे रस्ते जाळे आहे.
प्रश्न 20: ‘सुवर्णरेखा नदी’ ही पूर्व भारतातील अनेक राज्यांमधून वाहते, ती प्रामुख्याने कोणत्या दोन राज्यांमधून प्रवाहित होते ?
1) झारखंड व ओडिशा
2) ओडिशा व पश्चिम बंगाल
3) ओडिशा व बिहार
4) बिहार व पश्चिम बंगाल
उत्तर : 1) झारखंड व ओडिशा
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2025 प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Paper 04